आसाममध्ये आतंकवाद्यांनी ७ ट्रक पेटवले !

५ ट्रक चालकांचा होरपळून मृत्यू

देशातील एकतरी राज्य आतंकवाद किंवा नक्षलवाद यांपासून मुक्त आहे का ?

गौहत्ती (आसाम) – आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील दियुंगबराजवळ आतंकवाद्यांनी ७ ट्रक पेटवले. यात ५ ट्रकचालकांचा होरपळून मृत्यू झाला. या वेळी आतंकवाद्यांनी प्रथम हवेत गोळीबार केला आणि नंतर ट्रक पेटवून दिले. या आक्रमणामागे डी.एन्.एल्.ए. (दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी) ही आतंकवादी संघटना असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत.