
पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – देहली येथे ८ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ‘भारत बचाव आंदोलना’च्या समर्थनार्थ ‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात डिचोली, म्हापसा आदी ठिकाणी धरणे आंदोलन करून ब्रिटीशकालीन कायद्यांच्या प्रतीची होळी करण्यात आली.
देशविघातक ब्रिटीशकालीन कायदे रहित करून समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा आणि समान शिक्षण कायदा, हे देशाच्या हिताचे ५ कायदे अस्तित्वात आणण्याच्या मागणीसाठी ‘भारत बचाव आंदोलना’च्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी देहली येथे आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात धरणे आंदोलन करण्यात आले. समान नागरी कायदा गोव्यात अस्तित्वात आहे; मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !