
पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – देहली येथे ८ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ‘भारत बचाव आंदोलना’च्या समर्थनार्थ ‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात डिचोली, म्हापसा आदी ठिकाणी धरणे आंदोलन करून ब्रिटीशकालीन कायद्यांच्या प्रतीची होळी करण्यात आली.
देशविघातक ब्रिटीशकालीन कायदे रहित करून समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा आणि समान शिक्षण कायदा, हे देशाच्या हिताचे ५ कायदे अस्तित्वात आणण्याच्या मागणीसाठी ‘भारत बचाव आंदोलना’च्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी देहली येथे आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात धरणे आंदोलन करण्यात आले. समान नागरी कायदा गोव्यात अस्तित्वात आहे; मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !