सत्तरी तालुक्यात आलेल्या महापुरामध्ये नाणूस येथील गोशाळेतील ४२ गोवंशियांचा मृत्यू, तर २४ गोवंश गायब !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

वाळपई, २९ जुलै (वार्ता.) – सत्तरी तालुक्यात आलेल्या महापुरामध्ये नाणूस वाळपई येथील ‘जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ या गोशाळेवर जीवघेणे संकट कोसळले. महापुरात गोशाळेतील ४२ गोवंशियांचा मृत्यू झाला असून २४ गोवंश गायब आहेत. या महापुरात वाचलेली वासरे आपल्या आईसाठी हंबरडा फोडत आहेत. या महापुरात गोशाळेची १५ लाख रुपयांची हानी झाली आहे.

गोशाळेतील लोकांनी गुरांना वाट मोकळी करून देत पाण्यात अडकलेली ५० वासरे सुरक्षित ठिकाणी नेली. यामध्ये लहान वासरे वाचली; परंतु त्यांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले नाही. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, त्यात गुरे वाहून जाऊ लागली. या प्रवाहात एकूण ७२ गुरे वाहून गेली.