गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा संदेश

पृथ्वीवर अधर्म माजल्यावर ईश्वर अवतार घेतो आणि भक्तांचे रक्षण करतो. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही) असे भगवान श्रीकृष्णाने भक्तांना वचन दिले आहे. श्रीराम-श्रीकृष्ण आदी अवतारांनी अनेक लीला करून भक्तांचे रक्षण केले. प्रभु श्रीरामचंद्रांनी समस्त जिवांचे कल्याण करणारे रामराज्य स्थापले. भगवान श्रीकृष्णाने दुष्ट कौरवांचा पराभव करून धर्मराज्य स्थापले. कलियुगातही धर्मसंस्थापनेचे महान कार्य श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभले आहे. जसे रामरायाच्या कार्यात सहभागी होऊन वानरसेनेने स्वतःचा उद्धार करून घेतला, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करून घ्या !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२१)
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !