
कोल्हापूर – सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन वारकरी आणि भाविक यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले. करवीर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकार्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून बिनखांबी गणेश मंदिर ते खंडोबा तालीमपर्यंत पायी दिंडी त्यानंतर वाहनातून अनुमती देण्यात यावी. या वेळी दिंडीप्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज, अधिवक्ता राजेंद्र किंकर, अध्यक्ष बाळासाहेब पवार, पत्रकार राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, दीपक गौड यांसह अन्य उपस्थित होते. लवकरच विठ्ठल मंदिरात बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवली जाईल, असे ह.भ.प. आनंदराव लाड महाराज आणि बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
जेजुरी (पुणे) जवळील बेलसर येथे छत्रपतींच्या सरदारांच्या ऐतिहासिक भूमीवर धर्मांधांचे अतिक्रमण !