धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ; गावठी बॉम्बचाही वापर !

चोरीच्या संशयावरून पोलिसांनी कह्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू !

  • पोलिसांकडून तरुणाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल, तर या प्रकरणी पोलिसांची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र या घटनेसाठी धर्मांधांकडून कायदा हातात घेणे कदापि स्वीकारता येणार नाही !
  • पोलीस ठाण्यावर दगडफेक आणि बॉम्बफेक करणार्‍यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकार प्रयत्न करण्याची शक्यता अल्पच आहे !

आसनसोल (बंगाल) – येथे पोलिसांनी चोरीच्या संशयावरून कह्यात घेतलेल्या अमन अंसारी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यावर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, तसेच पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. धर्मांधांकडून गावठी बॉम्बही फोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच लाठीमारही केला. अंसारी याच्या मृत्यूच्या प्रकरणी २ पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

सौजन्य : Hindustan Times