
पनवेल – कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी पनवेल संघर्ष समितीने ६ जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता कळंबोली येथे एम्.जी.एम्. रुग्णालयासमोर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू याचे नेतृत्व करणार आहेत.
१. गेल्या वर्षभरापासून पनवेल संघर्ष समितीने सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्हे, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, सीआयडी विभागाचे रंजन शर्मा, सीआयडी पुणेच्या अधीक्षक रजनी सरोदे यांच्याकडे वारंवार बैठका घेऊन बँक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून संघर्ष चालू ठेवला आहे.
२. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधीक्षक शैलेंद्र कुमार यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराची त्यांनी नोंद घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयाने थेट मुख्य आरोपीला अटक केल्याने पनवेल संघर्ष समितीच्या मेहनतपूर्वक लढ्याला मोठे यश आल्याची खात्री ठेवीदारांची झाली आहे.
३. कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना रहित करावा, ठेवीदारांच्या ठेवींना असलेले ५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण लक्षात घेऊन त्यांना पैसे द्यावेत, अन्य दोषींवर अटकेची कारवाई करावी, तसेच दोषींच्या मालमत्ता गोठवून त्या लवकरात लवकर लिलावात काढून ५ लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी द्याव्यात, या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, अशी माहिती कडू यांनी दिली आहे.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत