प्रशासनाच्या सर्व उपाययोजना निष्फळ

सातारा, २९ मे (वार्ता.) – सातारा जिल्ह्याला कोरोनाने घट्ट विळखा घातला असून जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना कोरोनापुढे पूर्णत: निष्फळ ठरल्या आहेत. २९ मे या दिवशी सकाळपर्यंत २ सहस्र २५७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून गत २ दिवसांत ४ सहस्र ८०३ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. २८ मे या एकाच दिवशी ३० रुग्णांचा मृत्यू झाला असून गत २ दिवसांत मृतांची संख्या ६३ ऐवढी होती. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना अपुर्या असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल यांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी २८ मे या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्हा दौरा केला. या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाला चांगलेच फटकारले.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !