कोरोनासारख्या महामारीतही स्थिर रहाण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे हा महत्त्वपूर्ण उपाय ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते. कोरोनासाठीही साधना करणे, हाच उपाय आहे. कोरोनाच्या बातम्या पाहून अनेकांना ताण येत आहे. या ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी नामजप केल्यास लाभ होतो. सध्याच्या काळानुसार नामजप करणे, हीच साधना आहे. नामजप केल्यामुळे मन शांत आणि तणावरहित होते. तसेच नामजपाने मनाची शक्ती वाढते. नामजपासह प्रार्थना केल्याने मन:शांती मिळण्यासह ईश्‍वराची शक्ती मिळते. याचसमवेत अनिष्ट आणि नकारात्मक शक्ती यांपासून रक्षण होते. त्यामुळे आजपासूनच साधनेला आरंभ करायला हवा.