
कोल्हापूर – गांधीनगरच्या मुख्य रस्त्यापासून जवळच पंचगंगा नदी असून दोन्ही बाजूला मोठी व्यापारी संकुले आहेत. या रस्त्यावरील सर्व गटारी प्लास्टिक आणि इतर कचरा यांनी तुडुंब भरल्या आहेत. याचसमवेत गडमुडशिंगीहून आलेला ओढा कचर्याने तुडुंब भरलेला आहे. पावसाळ्यात ही गटारे तुंबून दुकानांमध्ये पाणी जाऊन प्रचंड हानी होते. तरी पंचगंगा नदीकाठी असणार्या उंचगाव, गांधीनगर येथील ओढे-नाले, गटारी पावसाळ्यांपूर्वी स्वच्छ कराव्यात, अशा मागणीचे निवेदन करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !