पंचगंगा नदीकाठी असणार्‍या उंचगाव, गांधीनगर येथील ओढे-नाले, गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ कराव्यात ! – राजू यादव, करवीर शिवसेना

श्री. राजू यादव

कोल्हापूर – गांधीनगरच्या मुख्य रस्त्यापासून जवळच पंचगंगा नदी असून दोन्ही बाजूला मोठी व्यापारी संकुले आहेत. या रस्त्यावरील सर्व गटारी प्लास्टिक आणि इतर कचरा यांनी तुडुंब भरल्या आहेत. याचसमवेत गडमुडशिंगीहून आलेला ओढा कचर्‍याने तुडुंब भरलेला आहे. पावसाळ्यात ही गटारे तुंबून दुकानांमध्ये पाणी जाऊन प्रचंड हानी होते. तरी पंचगंगा नदीकाठी असणार्‍या उंचगाव, गांधीनगर येथील ओढे-नाले, गटारी पावसाळ्यांपूर्वी स्वच्छ कराव्यात, अशा मागणीचे निवेदन करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.