लाचखोरांवर आतापर्यंत कठोर कारवाई झाली असती, तर कोरोनाच्या संकटकाळात त्यांना पकडण्यासाठी व्यय होणारा वेळ आणि मनुष्यबळ वाचवता आला असता !

पुणे, १७ मे – राज्याच्या लाचलुचपत विभागाने ११ मे पर्यंत राज्यात २७७ सापळे रचून ३७६ आरोपींना पकडले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
संभाजीनगर विभागात सर्वाधिक ८२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यानंतर नाशिक विभागात ६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे विभागात ६३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यावर पुणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे म्हणाले, ‘‘विभागाकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे अल्प तक्रारी आल्या असू शकतात. तक्रारदाराच्या तक्रारीवरून कारवाई केल्यानंतर कायदेशीर काम पूर्ण करून देण्यासाठी पाठपुरावा केला जातो.’’
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !