दळणवळण बंदीच्या काळात घरी असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावसत्संगातील दैवी वाणी ऐकून साधनेचे ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण होतांना पुष्कळ आनंद मिळणे

सौ. विद्या नलावडे

‘कोरोना महामारीच्या कालावधीत दळणवळण बंदी असतांना मी घरी होते. तेव्हा मी भ्रमणभाषवरून भावसत्संग ऐकायचे. एकदा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगात सांगितले, ‘‘बाहेर जरी आपत्काळ असला, तरी सनातनच्या साधकांसाठी तो ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’’ त्या वेळी ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंची वाणी म्हणजे दैवी वाणीच आहे’, असे मला वाटले. देवाने मला प्रतिदिन साधनेचे ध्येय घ्यायला सुचवले. मी प्रतिदिन १० ते १२ स्वयंसूचना सत्रे करणे, गुणात्मक नामजप करणे, दिवसभरात १०० प्रार्थना करणे, तसेच अधिकाधिक वेळ कृतज्ञताभावात राहून ‘घर आश्रम आहे’, असा भाव ठेवणे, असे साधनेचे ध्येय घेतले होते. देवाने माझ्याकडून हे सर्व प्रयत्न करवून घेतले. मला यातून पुष्कळ आनंद मिळाला.’

– सौ. विद्या नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक