
‘कोरोना महामारीच्या कालावधीत दळणवळण बंदी असतांना मी घरी होते. तेव्हा मी भ्रमणभाषवरून भावसत्संग ऐकायचे. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगात सांगितले, ‘‘बाहेर जरी आपत्काळ असला, तरी सनातनच्या साधकांसाठी तो ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’’ त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंची वाणी म्हणजे दैवी वाणीच आहे’, असे मला वाटले. देवाने मला प्रतिदिन साधनेचे ध्येय घ्यायला सुचवले. मी प्रतिदिन १० ते १२ स्वयंसूचना सत्रे करणे, गुणात्मक नामजप करणे, दिवसभरात १०० प्रार्थना करणे, तसेच अधिकाधिक वेळ कृतज्ञताभावात राहून ‘घर आश्रम आहे’, असा भाव ठेवणे, असे साधनेचे ध्येय घेतले होते. देवाने माझ्याकडून हे सर्व प्रयत्न करवून घेतले. मला यातून पुष्कळ आनंद मिळाला.’
– सौ. विद्या नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !