असा सल्ला देणार्या केंद्रीय मंत्र्यावर टीका
|

नवी देहली – बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल, असा सल्ला जोधपूर येथील एका रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना दिल्याने केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्यावर शेखावत यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.
“डॉक्टर अपना काम कर रहे हैं और बालाजी महाराज को आप नारियल चढ़ा देना, भगवान सब ठीक करेंगे” कहना किस नजरिए से गलत है? विरोधी मुझे समझाएं!
अस्पताल में भर्ती मरीज के परिजन को ढाढ़स बंधाना किस मानसिकता से गलत है, यह स्पष्ट किया जाए।
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) April 26, 2021
एक परेशान माताजी को दवा और दुआ दोनों पर भरोसा दिलाना मेरे कर्तव्य के दायरे में आता है और वही मैंने निभाया।
मुझे वहां दिन – रात ड्यूटी कर रहे डॉक्टरों द्वारा किए जा रहे इलाज पर कोई संदेह नहीं है। निश्चित रूप से वे अपनी जिम्मेदारी पूरी तरह निभा रहे हैं।
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) April 26, 2021
भगवान बालाजी पर आस्था रखने की बात कहना, बुराई है क्या?
राजस्थान ही नहीं देश और दुनिया में करोड़ों लोग बालाजी महाराज के भक्त हैं, अगर मैंने कह दिया कि नारियल चढ़ा दीजिएगा, तो क्या इससे मैं निष्क्रिय और लापरवाह साबित होता हूं?
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) April 26, 2021
शेखावत यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, डॉक्टर त्यांचे काम करत आहेत. बालाजीवर श्रद्धा ठेवा आणि नारळ वहा, असा सल्ला देण्यात काय चुकीचे आहे ? राजस्थानमध्येच नाही, तर देश आणि जगात कोट्यवधी लोक बालाजीचे भक्त आहेत. जर मी नारळ वहाण्यास सांगितले, तर त्यात मी निष्क्रीय आणि दायित्वशून्य कसा ठरू शकतो ? रुग्णालयात भरती असणार्या रुग्णाच्या नातेवाइकांना मानसिक आधार देणे चुकीचे आहे का? घाबरलेल्या रुग्णाच्या आईच्या मनाला शांती मिळावी म्हणून तिला आधार देणे, तसेच औषधांसमवेत प्रार्थनाही कामी येतील, हे सांगायचे काम मी केले. डॉक्टरांकडून मिळणार्या उपचारांच्या संदर्भात मला काहीही शंका नसून ते त्यांचे दायित्व अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडत आहेत.
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी