
सांगली – कोरोनाची दुसरी लाट मोठी असून गंभीर आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध काटेकोरपणे पाळण्यासाठी सांगली जिल्हावासियांनी साथ द्यावी, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘बाधित रुग्णांसाठी खाटा, औषधे आणि प्राणवायू यांचा साठा उपलब्ध ठेवावा. जिल्हा वार्षिक योजनेचा ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार असून यातून कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.’’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !