देशात आतापर्यंत १ लाख ६१ सहस्र लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ !

कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्या संदर्भातील सर्व नियम पाळणे आवश्यक आहे; मात्र जनतेकडून विविध कारणांमुळे त्याचे उल्लंघन केले जात आहे. याला जनतेप्रमणेच त्यांना शिस्त न लावणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत !

नवी देहली – देशातील कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. २७ मार्च या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २४ घंट्यांत कोरोनाचे ६२ सहस्र २५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ६१ सहस्र २४० इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे.