
नवी मुंबई – ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी सिडकोच्या वतीने नवी मुंबई रेल्वे विकास मंडळाला (एम्.आर्.व्ही.सी.) नवी मुंबईतील दिघा येथील भूमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे मार्गामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा भार न्यून होण्यासह कल्याण दिशेकडून येणार्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास साहाय्य होणार आहे, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
नवी मुंबई रेल्वे विकास मंडळाकडून सिडकोला २०१८ मध्ये ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी दिघा येथील वरील भूमी हस्तांतरित करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार दिघा येथील ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची भूमी ही प्रतीचौ.मी. २२ सहस्र ५०० रुपये दराप्रमाणे २ कोटी ६ लाख ७७ सहस्र ५०० रुपयांना भाडेपट्टा अधिमूल्य आकारून ९० वर्षांच्या भाडेपट्ट्याने रेल्वे विकास मंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !