देहली महामार्ग रिकामा करा !  

सिंघू सीमेवर स्थानिक नागरिकांकडून आंदोलनकारी शेतकर्‍यांच्या विरोधात निदर्शने

नवी देहली – येथील सिंघू सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या विरोधात येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी ‘देहली महामार्ग मोकळा करा’, अशी मागणी केली. गेल्या २ मासांपासून शेतकरी येथे ठाण मांडून आहेत.

स्थानिक नागरिकांनी म्हटले की, शेतकर्‍यांच्या चालू असलेल्या आंदोलनामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच ट्रॅक्टर मोर्च्यामुळे झालेल्या हिंसाचारामुळे भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला.