औरंगाबादच्या नामांतराविषयी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

संजय राऊत

मुंबई – बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण  किंवा अन्य कुणी महाराष्ट्रातील नेते आहेत, त्यांचे औरंगजबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कुणी लागत नव्हता, तसा औरंगजेबही लागत नाही.

औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे नेते एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.