सरकारचे साहाय्य मिळत नसल्याविषयी मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला

पुणे – येथील कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. पत्रकार रायकर यांचे निधन झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेले साहाय्य अद्यापही मिळाले नसल्याचे सांगत मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे साहाय्य करणार अशी घोषणा केली होती; मात्र राज्यात जवळपास ५० पत्रकारांचे बळी कोरोनाने घेतल्यानंतरही एकाही पत्रकाराच्या नातेवाइकांना सरकारने साहाय्य केलेले नाही, असे मराठी पत्रकार परिषदेचे म्हणणे आहे. (प्रशासन याविषयी काय करणार आहे, ते लवकर स्पष्ट करणे अपेक्षित ! – संपादक) या संदर्भात रायकर कुटुंबियांना तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी परिषदेने सरकारकडे एका पत्रकाद्वारे मागणी केली आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !