भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या दीड वर्षात ३५० प्रकरणांत धाडी घालूनही भ्रष्ट अधिकार्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी वरिष्ठांनी अद्याप अनुमती दिलेली नाही. चौकशीचा अर्थ आज-काल ‘कुणीच दोषी नाही’ असा झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले. चौकशीच्या नावाखाली केवळ दोषींना संरक्षण दिले जात असून भ्रष्ट अधिकार्यांवर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ८ जुलै या दिवशी केली.
संगणकातील महत्त्वाची माहिती नष्ट करण्यासाठी मंत्रालयातील वीज जाण्यासारखे प्रकार होऊ शकतात
मंत्रालयातील वीज खंडित होण्याच्या घटनेवर आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्रालयासारख्या ठिकाणी वीज जाणे अत्यंत गंभीर असून एखाद्या संगणकातील महत्त्वाची माहिती (डेटा) नष्ट करण्यासाठी असे प्रकार केले जाऊ शकतात. आज-काल असे ‘कलाकार’ वाढले आहेत’, असा संशय त्यांनी ८ जुलै या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
संपादकीय : गुन्हा तशी शिक्षा !
इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन : मातृभाषाप्रेमींमध्ये संताप
कांदोळी येथील किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अभिनेता सलमान खान यांना न्यायालयाची नोटीस
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?
शासकीय कर्तव्यात हयगय केल्यावरून २ अधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
मुरगाव येथील श्री दामोदर सप्ताहाच्या फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणा !