मुख्य सचिवांना अर्ध्या घंट्यात सभागृहात उपस्थित रहाण्याचे दिले निर्देश !

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – ८ जुलै या दिवशी विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव चालू असतांना सभागृहात सरकारच्या वतीने एकही मंत्री आणि सचिव उपस्थित नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केला. मंत्रालयात ११० सचिवांना सरकार वेतन देते, त्यातील ४ सचिवही सभागृहात उपस्थित राहू शकत नाहीत का? पुढील अर्ध्या घंट्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करीन, असे निर्देश देऊन राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल सभागृहात उपस्थित झाले. सभागृह पुन्हा चालू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीमंडळाची बैठक असल्यामुळे मंत्री तेथे गेल्याची माहिती सभागृहात दिली. त्यावर राहुल नार्वेकर यांनी ‘सभागृहाच्या कामकाजापेक्षा कोणतेही काम महत्त्वाचे नाही’, असे स्पष्ट केले.
इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन : मातृभाषाप्रेमींमध्ये संताप
कांदोळी येथील किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अभिनेता सलमान खान यांना न्यायालयाची नोटीस
शासकीय कर्तव्यात हयगय केल्यावरून २ अधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
मुरगाव येथील श्री दामोदर सप्ताहाच्या फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणा !
तज्ञांचे मत जाणून घेऊ ! – सौ. अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महापालिका
शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !