रेल्वेत अनधिकृतपणे वावरणार्‍यांवर कठोर कारवाई केव्हा ?

रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार यांनी मुंबईमधील रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. खरेतर रेल्वेत निर्धास्तपणे फिरणारे तृतीय पंथीय, भीक मागणारे भिकारी, बेकायदेशीर फेरीवाले आणि घुसखोर यांची संख्या लक्षणीय आहे. अशांचा उपद्रव सामान्य मुंबईकरांना नियमित होत असतोच. या सर्वांची माहिती रेल्वे प्रशासनाला नसेल, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. भिकारी, तृतीय पंथीय, बेकायदेशीर फेरीवाले हे सर्वच अनधिकृतपणे वावरत अवैध वा देशद्रोही कृत्ये करत असतात. या सर्वांवर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांनी कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची प्रामाणिक इच्छा आहे.

– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई. (२.७.२०२६)