‘एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून ‘जय जय रघुवीर समर्थ ।’, असे म्हटले. घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने त्यांच्या झोळीत भिक्षा घातली. या वेळी त्यांच्यात पुढील संवाद झाला.

स्त्री : महाराज, काही उपदेश द्या.
समर्थ : आज नाही. उद्या देतो.
दुसर्या दिवशी समर्थांनी पुन्हा तिच्या घरासमोर उभे राहून ‘जय जय रघुवीर समर्थ ।’ म्हटले. त्या दिवशी महिलेने बदाम-पिस्ता घालून खीर बनवली होती. ती खिरीचे वाडगे घेऊन बाहेर आली. समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर त्यात खीर ओतणार, इतक्यात तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. ते पाहून ती म्हणाली,
स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.
समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.
स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते.
समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ?
स्त्री : हो महाराज.
समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. जोपर्यंत मनात चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल. तेव्हाच खरे सुख आणि आनंद यांची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल.’
– श्री. सुदर्शन देसाई, अकलूज
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !
‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !