बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांची घोषणा
कोलकाता (बंगाल) – शुभेंदु अधिकारी यांच्या सरकारने कोलकात्यातील ‘सुर्हावर्दी एव्हेन्यू’ रस्त्याचे नामांतर करून ते गोपाल मुखर्जी उपाख्य गोपाल पाठा असे ठेवले आहे. सुर्हावर्दी फाळणीच्या वेळी ‘मुस्लिम लीग’चा प्रमुख नेता आणि बंगालचा मुख्यमंत्री होता. त्यानेच ‘डायरेक्ट ॲक्शन’ या लीगच्या हिंसक आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यात सहस्रावधी हिंदूंची हत्या आणि हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. यावरून त्याला ‘बंगालचा कसाई’ असे म्हटले जात होते.
आता वेळ आली आहे की, बंगालने खर्या नायकांना स्मरणात ठेवावे ! – मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी
मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले की, अनेक दशकांपासून आपल्या शहराच्या एका मुख्य रस्त्याचे नाव अशा व्यक्तीच्या नावावर होते, ज्याने केवळ राजकीय लाभासाठी राज्याच्या सत्तेचा शस्त्र म्हणून चुकीचा वापर केला आणि निष्पाप नागरिकांच्या नरसंहाराचा कट रचला. आता याचे नाव पालटून गोपाल मुखर्जी यांच्या नावावर ठेवले जात आहे. ते एक निर्भीड व्यक्ती होते, ज्यांनी सहस्रो निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मुख्य रक्षक म्हणून पाऊल पुढे टाकले होते. अशा प्रकारे एका खर्या रक्षकाचा आणि वाचवणार्याचा सन्मान करून ऐतिहासिक न्याय पुनर्संचयित केला जाईल. आता वेळ आली आहे की, बंगालने खर्या नायकांना स्मरणात ठेवावे, चुका सुधाराव्यात आणि त्यांचा सन्मान करावा.

Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या कर्मचार्यांना हटवले !
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता
मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !
भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
देशातील मंदिरांसाठी एका स्वतंत्र ‘सनातन संरक्षण बोर्ड’ किंवा समिती यांची स्थापना केली जावी ! – Shankaracharya Sadanand Saraswati