अनोळखी क्रमांकावरील ‘सायलेंट कॉल’द्वारे होऊ शकते सायबर फसवणूक !
नवी देहली – अनोळखी क्रमांकावरून दूरभाष येणे आणि कॉल उचलल्यानंतर ‘हॅलो’ म्हटल्यावर समोरून लगेच फोन कट होणे, हा प्रकार अनेकांच्या संदर्भात घडत असतो. हा प्रकार ‘सायलेंट कॉल’ फसवणुकीचा प्रकार असण्याची शक्यता असल्याने अशा कॉलकडे दुर्लक्ष न करण्याची चेतावणी गृह मंत्रालयाने दिली आहे.
पुन्हा त्या क्रमांकाशी संपर्क करू नये !
सायबर सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना अशा कॉलच्या संदर्भात सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे. कॉल उचलताच तो कट झाल्यास संबंधित क्रमांकाशी पुन्हा संपर्क (फोन) करू नये. वारंवार अशा प्रकारचे कॉल येत असल्यास तो क्रमांक बंदी सूचीत टाकावा, म्हणजेच ‘ब्लॉक‘ करावा. तसेच अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक अथवा बँकिंग माहिती देणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. दूरसंचार आस्थापनांकडून संशयास्पद क्रमांकांविषयी दाखवण्यात येणार्या सूचना गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फसवणुकीचा संशय आल्यास नागरिकांनी तत्काळ सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वरही तक्रार नोंदवावी, असे आवाहनही गृह मंत्रालयाने केले आहे.
‘सायलेंट कॉल’ फसवणूक म्हणजे काय ?
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर सुरक्षा संस्थेच्या माहितीनुसार फसवणुकीच्या या प्रकारांर्गत एकाच वेळी सहस्रो भ्रमणभाष क्रमांकांवर स्वयंचलित पद्धतीने फोन करतात. असा फोन करण्यामागे संवाद साधण्याचा हेतू नसतो. संबंधित व्यक्तीने फोन उचलला का ? आणि क्रमांक वापरात आहे का ?, यांची निश्चिती करणे, हा त्यामागील उद्देश असतो. व्यक्तीने फोन उचलताच त्याचा क्रमांक सक्रीय असल्याची माहिती फसवणूक करणार्यांना मिळते. त्यानंतर अशा क्रमांकांवर आर्थिक फसवणूक, बनावट पोलीस कारवाईच्या धमक्या, बँक खात्याची माहिती मागवणे, बक्षीस किंवा लॉटरीच्या नावाखाली जाळ्यात ओढणे, असे फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.

२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
लोहगडावरील मृत्यू घातपातच !