अंबरनाथ येथे कचर्‍याच्या ढिगार्‍यात गोवंशाचे अवशेष आढळले !

ठाणे – अंबरनाथ येथील चिंचपाडा भागातील खदान परिसरात कचर्‍याच्या ढिगार्‍यात गोवंशाचे अवशेष आढळून आले. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील हे अवशेष पाहून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून अज्ञातांनी गोवंशाची हत्या करून पुरावे लपवण्याच्या उद्देशाने ते येथे टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई कधी करणार ? – संपादक)

काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये गोमांसविक्री आणि अवैध पशूवधगृहे यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवून अनेक ठिकाणी कारवाई केली होती. त्यानंतरही शहरात छुप्या पद्धतीने गोहत्या चालू आहेत. (असे घडते, याचा अर्थ गोहत्या करणार्‍यांवर पोलिसांचा वचक नाही. पोलिसांची कारवाई थांबली की, ते सक्रीय होतात, हे सिद्ध होते. – संपादक) 

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच प्रतिदिन अशा घटनाघडतात ! ही स्थिती पालटण्यासाठी गोप्रेमींचे हिंदु राष्ट्र हवे !