
ठाणे – अंबरनाथ येथील चिंचपाडा भागातील खदान परिसरात कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळून आले. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील हे अवशेष पाहून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून अज्ञातांनी गोवंशाची हत्या करून पुरावे लपवण्याच्या उद्देशाने ते येथे टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई कधी करणार ? – संपादक)
काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये गोमांसविक्री आणि अवैध पशूवधगृहे यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवून अनेक ठिकाणी कारवाई केली होती. त्यानंतरही शहरात छुप्या पद्धतीने गोहत्या चालू आहेत. (असे घडते, याचा अर्थ गोहत्या करणार्यांवर पोलिसांचा वचक नाही. पोलिसांची कारवाई थांबली की, ते सक्रीय होतात, हे सिद्ध होते. – संपादक)
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान