घणसोली येथे बजरंग दलाकडून ४ गायींची सुटका !

नवी मुंबई, २७ मे (वार्ता.) – घणसोली पुलाखालून बजरंग दलाकडून ४ गायींची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती बजरंग दलाचे नवी मुंबईचे सहसंयोजक तेजस पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ईदनिमित्त घणसोली पुलाखाली गायींना विक्री आणि कत्तल यांसाठी आणले आहे, अशी माहिती मिळाली होती. (ही माहिती पोलिसांना का मिळाली नाही ? – संपादक) त्या अनुषंगाने बजरंग दलाचे गोरक्षक तेथे पोचले. तेथील जावेदने गायी त्याच्या असल्याचे सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे गायींच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि महानगरपालिकेची नोंदणी देण्यास सांगितली; मात्र ते तो सादर करू शकला नाही. महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या साहाय्याने गायींना सुरक्षितपणे कोंडवाड्यामध्ये पाठवण्यात आले.’’

संपादकीय भूमिका

गोरक्षणासाठी सतर्क असणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !