
नवी मुंबई, २७ मे (वार्ता.) – घणसोली पुलाखालून बजरंग दलाकडून ४ गायींची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती बजरंग दलाचे नवी मुंबईचे सहसंयोजक तेजस पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ईदनिमित्त घणसोली पुलाखाली गायींना विक्री आणि कत्तल यांसाठी आणले आहे, अशी माहिती मिळाली होती. (ही माहिती पोलिसांना का मिळाली नाही ? – संपादक) त्या अनुषंगाने बजरंग दलाचे गोरक्षक तेथे पोचले. तेथील जावेदने गायी त्याच्या असल्याचे सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे गायींच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि महानगरपालिकेची नोंदणी देण्यास सांगितली; मात्र ते तो सादर करू शकला नाही. महानगरपालिकेच्या कर्मचार्यांच्या साहाय्याने गायींना सुरक्षितपणे कोंडवाड्यामध्ये पाठवण्यात आले.’’
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक