विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना पत्र !

मुंबई – राज्यात ‘बकरी ईद’निमित्त संभाव्य गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. याविषयी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले आहे.
२७ मे या दिवशी ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर काही भागांत मोठ्या प्रमाणावर गोवंशहत्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः मालेगाव-नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घ्यावी. स्थानिक पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी. अवैध जनावरांची वाहतूक रोखावी, तसेच ‘गोवंश हत्या प्रतिबंधक’ कायद्याची काटेकोरपणे कार्यवाही करावी. गोसंरक्षणासाठी कार्य करणार्या गोरक्षकांवर आक्रमणे होण्याची शक्यताही आहे. अशी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक आणि सुरक्षात्मक कार्यवाही करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe