जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २८ दिवसांत ७३३ अमली पदार्थ तस्करांना अटक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यात गेल्या २८ दिवसांत पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीशी संबंधित ७३३ लोकांना अटक केली. या काळात तस्करांच्या ४७ घरांवर बुलडोझर चालवण्यात आला. ३७३ आरोपींचा वाहन चालवण्याचा परवाना रहित करण्यात आला. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ११४ मेडिकल दुकानांचे परवानेही रहित करण्यात आले. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यात अमली पदार्थ तस्करी संपवण्यासाठी १०० दिवसांची मोहीम चालू केली आहे.

संपादकीय भूमिका

कुठलीही गुन्हेगारी पोलिसांच्या छुप्या पाठिंब्याविना चालत नाही, असेच जनतेला वाटत असते, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्कर कार्यरत असतांना पोलीस काय करत होते ? हेही जनतेला ठाऊक असणारच !