नसरापूर घटनेतील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या !

सकल ब्राह्मण समाजाची मागणी

सातारा, ७ मे (वार्ता.) – पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. सातारा येथेही सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘निंदनीय कृत्य करणार्‍या विकृत नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, पदाधिकारी प्रशांत आठवले, महेश कुलकर्णी, श्रीकांत वेलणकर, राजदीप माजगावकर, नितीन जोशी, संजय देसाई, प्रज्ञा लाटकर, दीपाली कुलकर्णी उपस्थित होत्या.

संपादकीय भूमिका

अत्याचार प्रकरणाविषयी उमटलेल्या जनभावनांची सरकार नोंद घेईल का कि कालांतराने त्या विस्मरणात जातील ?