Bioterrorism : आतंकवाद्यांविरुद्ध ‘जैव आतंकवादा’चा ठपका ठेवणारे दोषारोपपत्र प्रविष्ट (दाखल) !

कर्णावती (गुजरात) – सहस्रो लोकांना विष देऊन मारण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने येथील न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. यामध्ये ३ आतंकवाद्यांची नावे असून ते इस्लामिक स्टेटशी संबंधित आहेत. डॉ. सय्यद अहमद मोहिउद्दीन, आझाद आणि महंमद सुहेल अशी त्यांची नावे असून त्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. त्या तिघांच्या विरोधात ‘जैव आतंकवाद’, म्हणजेच ‘बायोटेररिझम’चा आरोप ठेवण्यात आला आहे. अवैध कृत्ये प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र कायदा यांच्याशी संबंधित कलमांखाली दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.

तिघा आतंकवाद्यांनी सार्वजनिक ठिकाणी मिळणारे खाद्यपदार्थ आणि पेय यांमध्ये ‘रिसिन’ हे विष मिसळण्याचा कट रचला होता. या प्रकरणाची मूळ नोंद गुजरात आतंकवादविरोधी पथकाने केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये डॉ. मोहिउद्दीन याला अटक केल्यानंतर या प्रकरणाची वाढती व्याप्ती पहाता जानेवारी २०२६ मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे ते हस्तांतरित करण्यात आले.

‘रिसिन’ म्हणजे काय ?

‘रिसिन’

‘रिसिन’ हा एरंडीच्या बियांपासून मिळणारा अत्यंत विषारी पदार्थ आहे. याचा वापर ‘रासायनिक शस्त्र’ म्हणून करण्याचे आतंकवाद्यांचे उद्दिष्ट होते.