नसरापूर प्रकरणातील नराधामाला हाल हाल करून संपवा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे

मुंबई – नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ‘‘नसरापूर येथील घटनेने मला भयानक चीड आली असून नराधामाला हाल हाल करून संपवा. सरकारने आरोपींना कठोर आणि तात्काळ शिक्षा दिली पाहिजे. अशा प्रकरणांत सरकार वारंवार जलद गती न्यायालयाचा उल्लेख करते; मात्र सरकारने ‘जलद गती’ची नक्की व्याख्या काय आहे ? हे स्पष्ट करावे. राजकीय सत्ताधुंदीमुळे आज समाजातील मूल्ये नष्ट होत आहेत. जुनी मूल्यव्यवस्था ढासळल्यानेच गुन्हेगारीत वाढ होत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ अतिशय गंभीर गोष्ट आहे. यावर वेळीच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.