
मुंबई – नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ‘‘नसरापूर येथील घटनेने मला भयानक चीड आली असून नराधामाला हाल हाल करून संपवा. सरकारने आरोपींना कठोर आणि तात्काळ शिक्षा दिली पाहिजे. अशा प्रकरणांत सरकार वारंवार जलद गती न्यायालयाचा उल्लेख करते; मात्र सरकारने ‘जलद गती’ची नक्की व्याख्या काय आहे ? हे स्पष्ट करावे. राजकीय सत्ताधुंदीमुळे आज समाजातील मूल्ये नष्ट होत आहेत. जुनी मूल्यव्यवस्था ढासळल्यानेच गुन्हेगारीत वाढ होत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ अतिशय गंभीर गोष्ट आहे. यावर वेळीच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल…
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2026
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक