वाशी येथील पदपथ फेरीवाल्यांच्या कह्यात : पादचार्‍यांची गैरसोय !

पदपथा वर फेरी वा ल्यां नी केलेले अतिक्रमण

नवी मुंबई, १४ एप्रिल (वार्ता.) – वाशी येथील पदपथावर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय थाटल्याने पादचार्‍यांना येथून चालतांना अडचण येते.

येथील सेक्टर ९ ते सेक्टर १२ पर्यंत मुख्य रस्त्यालगतच्या पदपथावर दिवसभर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. दुकानदारांनीही दुकानांसमोरील ५ ते १० मीटरपर्यंतच्या सामासिक जागेमध्ये दुकानातील वस्तूंचे प्रदर्शन लावले आहे. काही दुकानदारांनी ही जागा अन्य व्यावसायिकांना भाड्याने दिली आहे. पादचार्‍यांना पदपथावरून चालणे शक्य नसल्याने ते रस्त्यावरून जातात. परिणामी रस्त्यावरील वाहनांचा धक्का लागून किरकोळ अपघात घडत आहेत. गर्दीचा अपलाभ घेत भुरट्या चोरांचे फावते. ‘वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून रहिवाशांना फेरीवालामुक्त पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासन ‘फेरीवालामुक्त शहर’ का करत नाही ?