
देवगड – तालुक्यातील दहिबाव येथे गंगाक्षेत्रावरील कुंडात १ एप्रिलपासून गंगा अवतरली आहे. गंगा येण्यापूर्वी कुंडातील पाणी दूधाळ होते. सध्या हे गंगाकुंड पाण्याने तुडूंब भरून वहात आहे. कुंडाच्या गोमुखातून पाण्याचा जोरदार प्रवाह चालू आहे. गंगा अवतरल्याचे समजताच भाविक गंगाक्षेत्रावर गर्दी करून लागले आहेत. अनेक भाविकांनी तेथे स्नानाची पर्वणी साधली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे गंगा अवतरल्यानंतर ८ दिवसांनी दहिबाव येथील गंगाक्षेत्रात गंगा अवतरली आहे.
यापूर्वी प्रत्येक ३ वर्षांनी नियमित येणार्या गंगेचे आगमन आणि गमन या कालखंडात पालट झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. गंगामाईचे आगमन आणि गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखित झाले आहे. गंगाक्षेत्रानजीकच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट