काठमांडू (नेपाळ) – भारतीय नोंदणी क्रमांक असलेल्या दुचाकींना नेपाळमध्ये प्रवेश करतांना प्रवेश परवाना घेणे बंधनकारक असेल, असे नेपाळ प्रशासनाने घोषित केले आहे. याखेरीज निश्चित कालावधीसाठी पासही दिला जाईल. या आधारावर केवळ मुख्यालय परिसरापर्यंतच फिरण्याची अनुमती दिली जाईल, तर आत प्रवेश करतांना सीमाशुल्क भरणे अनिवार्य असेल.
भारतियांमध्ये संताप
या नियमामुळे काही भारतीय नागरिकांमध्ये अप्रसन्नता निर्माण झाली. ‘भारतीय वाहनांवर अधिक कठोर निर्बंध लादले जात आहेत, तर नेपाळी वाहने भारतात मुक्तपणे फिरत आहेत. नेपाळी वाहनांच्या भारतातील प्रवेशासाठीही असेच नियम लागू करावेत’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ‘सीमावर्ती भागापर्यंत वाहतुकीला अनुमती द्यावी; परंतु प्रवेशावेळी कर किंवा प्रवेश शुल्क अनिवार्य करावे’, असे भारतियांचे म्हणणे आहे.

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण