|

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – खासगी मालमत्तेवर मोठ्या संख्येने लोकांना एकत्र करून नमाजपठण करणे योग्य नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने बरेली येथील सामूहिक नमाजपठणाच्या प्रकरणात दिला. न्यायालयाने खासगी मालमत्तेवरील अशा सामूहिक नमाजपठणाच्या प्रथेवर आक्षेप घेत ती रोखण्याचे निर्देश दिले. तसेच शांतता भंग होण्याची शक्यता असल्यास प्रशासनाला कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
१. न्यायालयाने नमूद केले की, वैयक्तिक सुरक्षा आणि खासगी मालमत्ता यांच्या आडून सार्वजनिक सुव्यवस्था अन् लोकशांतता धोक्यात घालता येणार नाही.
२. बरेली येथील रहिवासी तारिक खान यांनी रमझानच्या काळात खासगी मालमत्तेच्या ठिकाणी नमाजपठण करण्यावर घातलेल्या बंदीच्या विरोधात आणि शांतता भंग प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.
३. राज्य सरकारकडून अतिरिक्त महाधिवक्ता अनूप त्रिवेदी यांनी न्यायालयास कळवले की, याचिकाकर्ता सुरक्षेच्या कारणांचा आधार घेऊन नियमांचा गैरवापर करत आहे. सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र आणि पुरावे यांनुसार याचिकाकर्त्याच्या खासगी मालमत्तेवर प्रतिदिन ५० ते ६० लोक नमाजपठणासाठी एकत्र येत होते, ज्यामुळे परिसरातील धार्मिक सौहार्दता आणि सुरक्षितता यांना धोका निर्माण होत होता.
५. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य असून सार्वजनिक शांततेत अडथळा निर्माण करणार्या अशा प्रथांना अनुमती देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
६. पुन्हा नमाजपठणाच्या नावाखाली जमाव गोळा करून परिसरातील शांततेला बाधा आणल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यास पूर्णपणे मोकळे असतील.
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
अडचणी असल्या, तरी जलजीवन मिशन योजना पूर्ण करावीच लागेल !