निवासी आधुनिक वैद्यांच्या संघटनांचा आरोप

मुंबई – राज्यातील निवासी आधुनिक वैद्य प्रचंड मानसिक दबावाखाली काम करत असून परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या थीसिसवर (संशोधन प्रबंधांवर) स्वाक्षरी मिळवण्यासाठी २-३ लाख रुपयांची मागणी केली जात आहे, अशा गंभीर तक्रारी निवासी आधुनिक वैद्यांच्या संघटनांनी केल्या आहेत.
१. निवासी आधुनिक वैद्यांच्या कामाच्या वेळा अत्यंत अनियमित असून काही ठिकाणी सलग १२ घंटे, तर काही ठिकाणी ४८ घंट्यांपर्यंत काम करावे लागते.
२. संशोधन प्रबंधांवर स्वाक्षरीसाठी पैसे मागण्याचा प्रकार मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, मिरज, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अंबाजोगाई अशा अनेक ठिकाणी घडतो.
३. अन्यायाविरोधात आवाज उठवणार्या आधुनिक वैद्यांना अनुत्तीर्ण करण्याच्या धमक्या दिल्या जातात. शस्त्रकर्म शिकणार्या आधुनिक वैद्यांच्या ते करण्याची संधी नाकारली जाते. शिक्षणात अडथळे निर्माण होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी मौन बाळगतात.
संपादकीय भूमिकावैद्यकीय क्षेत्राला कलंकित करण्याचाच हा प्रकार होय ! असे करणार्यांकडून त्यांनी आतापर्यंत लुबाडलेली रक्कम सव्याज वसूल करायला हवी ! |
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !