निवासी आधुनिक वैद्यांच्या संघटनांचा आरोप

मुंबई – राज्यातील निवासी आधुनिक वैद्य प्रचंड मानसिक दबावाखाली काम करत असून परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या थीसिसवर (संशोधन प्रबंधांवर) स्वाक्षरी मिळवण्यासाठी २-३ लाख रुपयांची मागणी केली जात आहे, अशा गंभीर तक्रारी निवासी आधुनिक वैद्यांच्या संघटनांनी केल्या आहेत.
१. निवासी आधुनिक वैद्यांच्या कामाच्या वेळा अत्यंत अनियमित असून काही ठिकाणी सलग १२ घंटे, तर काही ठिकाणी ४८ घंट्यांपर्यंत काम करावे लागते.
२. संशोधन प्रबंधांवर स्वाक्षरीसाठी पैसे मागण्याचा प्रकार मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, मिरज, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अंबाजोगाई अशा अनेक ठिकाणी घडतो.
३. अन्यायाविरोधात आवाज उठवणार्या आधुनिक वैद्यांना अनुत्तीर्ण करण्याच्या धमक्या दिल्या जातात. शस्त्रकर्म शिकणार्या आधुनिक वैद्यांच्या ते करण्याची संधी नाकारली जाते. शिक्षणात अडथळे निर्माण होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी मौन बाळगतात.
संपादकीय भूमिकावैद्यकीय क्षेत्राला कलंकित करण्याचाच हा प्रकार होय ! असे करणार्यांकडून त्यांनी आतापर्यंत लुबाडलेली रक्कम सव्याज वसूल करायला हवी ! |
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !