
मुंबई – नक्षलवाद्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात ८५३ जणांना ठार केले आहे. यामध्ये २४४ पोलीस आणि ६०९ नागरिक यांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ३० मार्च या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची अर्धवार्षिक परिषद झाली. परिषदेनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना वरील माहिती दिली.
या वेळी नक्षलवाद्यांविरुद्ध लढा देणार्या ‘सी-६०’ (महाराष्ट्र पोलिसांचे एक विशेष कमांडो पथक) सैनिकांच्या तुकडीमध्ये किमान ३ वर्षे सेवा केलेल्या सैनिकांना ‘सी-६०’ पदकाने गौरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘माओवादाच्या विरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळवले आहे. माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. तिच्या पुनरुज्जीवनाला आळा घालणे, हे पुढील मोठे आव्हान आहे.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !