
ठाणे, १७ मार्च (वार्ता.) – देहली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये १५ मार्चला सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर, उल्हासनगर क्र. ३ येथून निघाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून स्वामी विवेकानंद चौक आणि डॉ. भीमराव आंबेडकर चौक येथून परत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर, उल्हासनगर क्र.३, येथे मोर्चाची सांगता झाली.
मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी हातात भगवे झेंडे आणि मशाली घेतल्या होत्या. ‘तरुण खाटीक हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा है ।’, ‘फाशी दो, फाशी दो, हत्यारों को फाशी दो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
या मोर्चाचे आयोजन ‘हिंदु जोडो यात्रा समिती भारतवर्ष’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल जयस्वाल यांनी केले होते. मोर्चामध्ये अखिल भारतीय नवयुग संघाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन चंडालिया, राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष श्री. निखिल गोळे, जय महाराष्ट्र मित्र मंडळचे पदाधिकारी श्री. अशोक श्रीवास्तव, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. आशिष शर्मा, तसेच हिंदु जनजागृती समितीकडून श्री. उल्हास चौधरी आणि श्री. वीरेश अहिर हे सहभागी झाले होते.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !