
ठाणे, १७ मार्च (वार्ता.) – देहली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये १५ मार्चला सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर, उल्हासनगर क्र. ३ येथून निघाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून स्वामी विवेकानंद चौक आणि डॉ. भीमराव आंबेडकर चौक येथून परत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर, उल्हासनगर क्र.३, येथे मोर्चाची सांगता झाली.
मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी हातात भगवे झेंडे आणि मशाली घेतल्या होत्या. ‘तरुण खाटीक हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा है ।’, ‘फाशी दो, फाशी दो, हत्यारों को फाशी दो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
या मोर्चाचे आयोजन ‘हिंदु जोडो यात्रा समिती भारतवर्ष’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल जयस्वाल यांनी केले होते. मोर्चामध्ये अखिल भारतीय नवयुग संघाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन चंडालिया, राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष श्री. निखिल गोळे, जय महाराष्ट्र मित्र मंडळचे पदाधिकारी श्री. अशोक श्रीवास्तव, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. आशिष शर्मा, तसेच हिंदु जनजागृती समितीकडून श्री. उल्हास चौधरी आणि श्री. वीरेश अहिर हे सहभागी झाले होते.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !