यशाची गुरुकिल्ली ‘श्रद्धा आणि समर्पण’ यांच्या उत्कटतेवर अवलंबून असते !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘जसे संसार आणि प्रपंच यांत समर्पण, तसेच परमार्थ, अध्यात्म आणि आदर्श यांवर पूर्ण समर्पण असेल, तरच यशाची आशा आहे. यशाची गुरुकिल्ली श्रद्धा आणि समर्पण असते. यशाचे मापही श्रद्धा आणि समर्पणाच्या उत्कटतेवर अवलंबून आहे. जशी श्रद्धा, तसे तितकेच त्याचे फळ. ब्रह्मप्राप्ती हे श्रेष्ठतम अंतिम साध्य आहे. त्याचे मोलही तसेच आहे ! तिथे पूर्ण श्रद्धा, समर्पण हवे. अणूमात्र उणे नको.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)