
‘क्रूरकर्मा टिपूने कर्नाटकात धिंगाणा घातला. सहस्रावधी हिंदूंना रक्तस्नान घातले. सहस्रो स्त्रियांवर विहिरीत उड्या घेण्याचे प्रसंग आले. नरगुंद आणि कित्तूर या संस्थानांमध्ये टिपूने अक्षरशः नंगानाच घातला. सहस्रो स्त्रियांवर अत्याचार करविले. अमर्याद प्रमाणात जाळपोळ आणि विध्वंस केला.

याचा प्रतिशोध घेण्यासाठी मराठ्यांच्या बलदंड सेनांनी सरदार पटवर्धन, फडके, बेहरे, होळकर, भोसले यांच्या नेतृत्वाखाली टिपूच्या सैन्याला झोडपीत झोडपीत सारा कर्नाटक मुक्त केला. मुसलमानी सैन्याचा प्रचंड संहार केला. त्याच वेळी इंग्रजांनीसुद्धा टिपूवर हल्ले चढवले. भयग्रस्त झालेल्या हिंदुद्वेष्ट्या टिपूने नंतर हिंदु देवीदेवतांची भक्ती करायला प्रारंभ केला. देवस्थानांना देणग्या दिल्या. अनुष्ठाने केली. शंकराचार्यांचा सत्कार केला. तरीही अखेर टिपूचे सारे राज्य मराठ्यांनी जिंकले आणि टिपू मारला गेला.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. ॐ
(साभार : ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथामधून)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !