
‘जे विचार घरात, तेच सार्वजनिक ठिकाणी असले पाहिजेत. अमेरिकेतील ४०० विद्यापिठांमध्ये भारतातील वेदांचा अभ्यास केला जात आहे. काही दिवसांनी अमेरिकेतील मंडळी सोवळे घालून फिरतील, तर आपल्याकडील मंडळी सार्वजनिक ठिकाणी ‘पार्ट्या’ (मेजवान्या) करतील. ‘आम्ही देव मानत नाही, धर्म मानत नाही’, ही सर्व वृत्ती या देशातील सरकारने केलेली आहे. वर्ष १९४७ मध्ये या देशाचे तुकडे झाले, जो काही आमचा भाग होता, तो तोडला गेला, अनेकांवर अत्याचार झाले. त्या वेळी हिंदू संकटात सापडले. तेव्हाचे २ कोटी ५० लाख आता २५ कोटी झाले. लोकशाहीमध्ये मते आणि बहुमत यांना महत्त्व असेल, तर डोळ्यांवर चामडे ओढून बसणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही. ही स्थिती अशीच चालू राहिली, तर पुढे रहाणेही अशक्य होईल.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !