पंढरपूर ‘कॉरिडॉर’ला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र !

मुंबई – पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. येथील मातीला स्पर्श करणे हेही पुण्याचे कर्म मानले जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्री वाराणसी किंवा उज्जैन यांच्या धर्तीवर ‘कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) लादणे अयोग्य आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी प्रस्तावित ‘पंढरपूर कॉरिडॉर’ला विरोध दर्शवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची आणि वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा जपण्याची विनंती केली आहे.
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पत्रात उपस्थित केलेली महत्त्वपूर्ण सूत्रे अशी…
१. पंढरपूरमध्ये गेल्या अनेक शतकांपासून ‘यजमान कृत्य’ (भाविकांना घरात आश्रय देणे) ही परंपरा चालत आली आहे. ७०० हून अधिक मालमत्ता, प्राचीन मठ आणि मंदिरे पाडून कॉरिडॉर उभारणे, हा वारकर्यांच्या भावनांशी खेळ आहे.
२. यात्रेकरूंसाठी राखीव असलेल्या ६५ एकरसारख्या अनेक भूखंडांवर आज झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवण्याऐवजी सरकार जुने पंढरपूर उद्ध्वस्त करायला निघाले आहे. हा सार्वजनिक पैशांचा अपवापर आहे.
३. वर्ष २०१४ आणि २०२५ च्या विकास आराखड्यात या कॉरिडॉरचा कोणताही उल्लेख नाही. केवळ वाराणसीच्या धर्तीवर व्यापारी संकुल आणि मनोरंजन केंद्र उभारणे, हे तीर्थक्षेत्राच्या पावित्र्याला बाधा आणणारे आहे.
४. चंद्रभागेच्या पलीकडील तीरावरील भूमीचा वापर करून किंवा सध्याच्या सुविधांची योग्य देखभाल करून भाविकांना सोयी देता येतील. त्यासाठी मंदिराजवळील प्राचीन वास्तू पाडण्याची आवश्यकता नाही.
५. डॉ. स्वामी यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, सरकारने भजन-कीर्तनाचे मंडप पाडून नवीन सभागृह बांधण्याचा प्रस्ताव ठेवणे हास्यास्पद आहे. जेथे भक्तीचा वास आहे, ती ठिकाणे पाडून नवीन बांधकामे करणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचे आहे.
संपादकीय भूमिका
|
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !