
मुंबई – पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. विदेशी भाषांचा वापर टाळावा. मुलांशी घरी मातृभाषेतून संभाषण करावे. मातृभाषेचा वापर वाढला पाहिजे. ‘मम्मी-डॅडी’ म्हणण्यापेक्षा आई-वडील असेच म्हटले पाहिजे, असे मत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. येथील वरळी डोम येथे चालू असलेल्या २ दिवसीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
सामाजिक समरसता, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, राज्यघटना यांवर आधारित नागरी कर्तव्यांचे पालन करा !
या वेळी प.पू. सरसंघचालक म्हणाले की, संघाला जाणून घ्यायचे असेल, तर संघ शाखांचा अनुभव घ्यावा. संघाची शाखा, कार्यकर्ते, शिबिरे आदींचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास संघ यथार्थ समजेल. कितीही आरोप अथवा टीका झाली, तरी संघाचे काम सतत चालू असते. संघाला प्रसिद्धीचा सोस नाही. सामाजिक समरसता, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, राज्यघटना यांवर आधारित नागरी कर्तव्यांचे पालन यांवर भर द्या.
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !