बांगलादेशाच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी टी-२० क्रिकेट विश्वचषकातील भारत-पाक सामना न खेळण्याचा निर्णय

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली माहिती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – टी-२० क्रिकेट विश्वचषकाविषयी आम्ही एक स्पष्ट पाऊल उचलले आहे की, आम्ही भारताविरुद्ध सामना खेळणार नाही; कारण क्रीडा क्षेत्रात कोणतेही राजकारण नसावे. आम्ही काळजीपूर्वक विचार करून ही भूमिका घेतली आहे आणि आपल्याला बांगलादेशाच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहिले पाहिजे. मला वाटते की, हा एक अतिशय योग्य निर्णय आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगितले. टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ फेब्रुवारीला होणार होता; पण पाकने हा सामना खेळण्यास नकार दिला असून पंतप्रधान शरीफ यांनी त्याला अधिकृत दुजोरा वरील विधानातून दिला आहे.

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश संघासमवेत  एकता दर्शवण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

बांगलादेशाने त्याचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती आणि ही मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (सीसीआयने) फेटाळली होती. त्यामुळे बांगलादेशाने या स्पर्धेवर बहिष्कार घातला. बांगलादेशाला साहाय्य करण्यासाठी पाकने वरील निर्णय घेतला.

संपाकीदय भूमिका

याला म्हणतात सुंठी वाचून खोकला गेला ! पाकसमवेत भारताने कुठेही क्रिकेट खेळू नये, असेच भारतियांना वाटत असते, तरीही भारत खेळतो, हे चुकीचेच आहे. आता पाकच खेळणार नसेल, तर ते चांगलेच म्हणावे लागेल !