
‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वाेत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक सनातन प्रभात ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे, तसेच त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दलचे प्रेम वाढत आहे. ‘या अंकाच्या वाचनाने आम्हाला पुढची दिशा आणि मार्गदर्शन मिळते’, असे काही वाचक उत्स्फूर्तपणे सांगतात.
असे असतांनाही ‘प्रथम भेटीतच जिज्ञासूंना वाचक बनण्यास कसे सांगू ? त्यांच्याशी जवळीक साधून नंतर वाचक होण्यासाठी प्रवृत्त करूया’, असे बर्याच साधकांना वाटते. त्यामुळे ते जिज्ञासूंना वाचक होण्यासाठी तत्परतेने उद्युक्त करत नाहीत.
आपल्या अयोग्य विचारप्रक्रियेमुळे जिज्ञासू अमूल्य सत्संगापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्वत्रच्या साधकांनी जिज्ञासूंना वाचक बनवण्यासाठी प्रथम भेटीपासूनच प्रयत्न करावेत.’
(२३.१.२०२६)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !