प्रशासन आणि पोलीस यांच्या निष्क्रीयतेमुळे ग्रामस्थांची आंदोलनाची चेतावणी !

वेताळ देवस्थानाच्या विटंबनेचे प्रकरण

हनुमान मंदिराच्या बैठकीत उपस्थित ग्रामस्थ

खोपोली (जिल्हा रायगड) – येथील लव्हेज गावातील वेताळ देवस्थानाच्या विटंबनेच्या प्रकरणी पालिका प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली. गावातील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेत आंदोलन करण्याचे ठरवले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. येथे गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळ वेताळ देवस्थान आहे. या ठिकाणी ग्रामस्थांकडून नियमित त्याची पूजा केली जात होती; मात्र येथील एका ठेकेदाराने रात्रीच्या वेळी हे देवस्थान अंशतः हलवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकरणी ग्रामस्थांनी मोर्चाही काढला होता. तेव्हा नगराध्यक्ष कुलदीप शेटे यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र याविषयी ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. (नगराध्यक्षांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक) पोलीसही टाळाटाळ करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंवरच आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी !
  • विटंबनेच्या प्रकरणात निष्क्रीय असणारे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे !