परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘साधना आणि भक्ती यांमुळे पूर्वी हिंदू एकत्र होते. आज साधना आणि भक्ती यांपासून दूर झालेले हिंदू एकमेकांपासूनही दूर झाले आहेत. हिंदूऐक्यासाठी एकमेव उपाय, म्हणजे सर्वांना साधना करायला लावणे ! ’
‘साधना आणि भक्ती यांमुळे पूर्वी हिंदू एकत्र होते. आज साधना आणि भक्ती यांपासून दूर झालेले हिंदू एकमेकांपासूनही दूर झाले आहेत. हिंदूऐक्यासाठी एकमेव उपाय, म्हणजे सर्वांना साधना करायला लावणे ! ’
‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कुणी विचारही करत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे. मनोलय आणि बुद्धीलय झाल्यावर खर्या अर्थाने अध्यात्मामध्ये प्रवेश होतो. त्यामुळे मन आणि बुद्धी यांच्या स्तरांवर असणार्या संशोधकांना अध्यात्म कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गुरुमंत्र देण्यास योग्य असणार्या शिष्यालाच गुरु तो मंत्र देतात.
‘ज्यांना आपल्या कुटुंबियांच्या समवेत, म्हणजे आई-वडील, भाऊ, बहीण, पुतणे यांच्या समवेत एकत्र रहाता येत नाही, असे हिंदू कधी इतर हिंदूंसह संघटित होऊन हिंदूंच्या रक्षणासाठी काही करतील का ?’
‘लढून हिंदु राष्ट्र आणणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात युगानुयुगे अजरामर होईल, तर अहिंसावाद्यांचे नाव ४० – ५० वर्षांत पूर्णपणे विसरले जाईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘धर्मांधांपेक्षा धर्मविरोधक बुद्धीप्रामाण्यवादी अधिक धोकादायक असतात !’
‘हिंदु धर्मात धर्मप्रसारास नाही, तर धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने जनतेला माणुसकी शिकवली नाही. परिणामी देश सर्वच बाबतीत परिसीमेच्या अधोगतीला पोचला आहे.’
‘विज्ञान मायेतील गोष्टींच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्मात ईश्वर, ब्रह्म इत्यादींच्या संदर्भात संशोधन केले जाते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले