आध्यात्मिक विकास, हाच समर्पक विकास !

मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मनुष्याला आध्यात्मिक साक्षात्कार झाल्यास तो खर्‍या अर्थी सुखी होणे

‘जेव्हा ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे, मी हे शरीर नाही, तर मी दिव्य आत्मा आहे, परब्रह्माचा दिव्य अंश आहे’, असे मनुष्याला कळते, तेव्हा त्याला ‘ब्रह्मानुभव’ म्हणतात. असा ब्रह्मानुभव होताच मनुष्य सुखी होतो.

साधनेतील प्रगती स्वतःच्या प्रयत्नांवरच अवलंबून असते !

सूर्य उगवला की, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि तो सर्वांना दिसतोच. त्याप्रमाणे साधकाची साधना अंतर्मनातून चांगली चालू असेल, तर त्याच्या अंतरातील साधना-दीप प्रदीप्त होतो आणि त्याचा प्रकाश पसरून तो दिसतोच.

‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर सिद्ध करणार्‍या सद्गुरु (सौ.) सखदेवआजी !

वर्ष २०१५ मध्ये पू. सखदेवआजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना उपाय करण्यासाठी नामजप, न्यास आणि मुद्रा शोधत. त्या वेळी पू. आजींनी शोधलेले उत्तर आणि मी शोधलेले उत्तर ९० टक्के वेळा एकच असे. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर प्रकर्षाने सिद्ध होते.

आपण अंतर्मुख झाल्यास ‘आपण कसे आहोत’, याची सम्यक कल्पना येते !

स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना फार मोठ्या असतात; पण आपण अंतर्मुख झालो, म्हणजे भव्य-दिव्य आरशात आपण आपल्याला पाहू शकतो आणि आपण कसे आहोत, याची आपणास सम्यक कल्पना येते.’

भगवंताच्या आड येणार्‍या पत्नीचा त्याग करण्यास सांगणारे श्रीरामकृष्ण परमहंस !

श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको !

ज्ञानप्राप्तीच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय तळमळ !

‘जुलै २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘लुंगी’ (मुंडू) या वस्त्राच्या संदर्भातील एका प्रश्‍नाचे उत्तर सूक्ष्म ज्ञानातून मिळवण्याचा निरोप दिला होता. त्या प्रश्‍नाच्या मिळालेल्या उत्तरावर त्यांनी २२ उपप्रश्‍न विचारले आणि पुढे त्या उत्तरांवरही विविध प्रश्‍न विचारले.

‘अतिथी’ म्हणून नव्हे, तर ‘एक कुटुंबीय’ म्हणून सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे सद्गुरु सिरियाक वाले यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पुण्यातील साधक श्री. प्रताप कापडीया यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !