कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे. या ‘वॉर रूम’साठी १८००२ ६७८४६६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. अशा वासनांधांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

खासगी डॉक्टरांनी चिकित्सालये बंद ठेवून रुग्णांची असुविधा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांच्या व्यतिरिक्त अन्यही रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात. त्यामध्ये वयोवृद्ध, महिला, मुले असतात. त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांनी स्वत:ची चिकित्सालये बंद करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

इचलकरंजी येथे नमाजपठणासाठी जमलेल्यांवर कारवाई करणार्‍या पोलिसांवर धर्मांधांची दगडफेक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असतांनाही गावभाग परिसरातील एका प्रार्थनास्थळात ७० हून अधिक धर्मांधांच्या उपस्थितीत नमाजपठण चालू होते. ही माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आणि प्रभारी निरीक्षक यांनी या ठिकाणी जमलेल्या सर्वांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

दळणवळण बंदीमुळे रत्नागिरीत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत काही लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. याला आळा घलण्यासाठी रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे

सध्याच्या घडीला सर्वांनी पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पोलिसांच्या घरात मुले-पत्नी, आई-वडील आहेत. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यावर किती ताण टाकायचा याचा विचार करायला हवा. काही भागांत लोक रस्त्यांवर विनाकारण गर्दी करत आहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत.

मृत कोरोनाग्रस्त महिला नवी मुंबईतील नव्हे, तर मुंबईतील रहिवासी – आयुक्त

‘व्हाट्सअ‍ॅप’वर वाशीतील निवासी कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू ही बातमी प्रसारीत होत आहे, वस्तूतः ही महिला नवी मुंबईतील नसून मुंबईतील गोवंडी येथील होती, असे महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

केंद्रशासनाच्या योजनेचा लाभ राज्यातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषित केलेले १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य हे देशातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याचे २६ मार्चला स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे देशात दळणवळण बंद करण्यात आल्याने कामासाठी किंवा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर असलेले अनेक जण अडकून पडले आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणी यंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात बंदी नाही ! – कृषीमंत्री दादा भुसे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमध्ये कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लादलेली नाही.